शनिवार, ३ ऑक्टोबर, २०१५

गणेश उत्सव ते दिवाळी 

भारतात प्रत्येक प्रांतात शहरात गावागावात जितके सौन्दर्य आहे . तेवढे जगात अन्यत्रच कुठतरी पाहायला मिळू शकते.
 पौराणिक काळापासून ते आजपर्यंत देशात विविध सण , कार्यक्रम १२ महिने सुरूच असतात.
हे सण का सुरु झाले . त्यावेळी नेमके काय करायचे असते. जेवणातील विविधता त्यात्या सणामध्ये वेगवेगळ्या प्रकारात कशासाठी असते. यांवर आपल्या घरातील वृद्ध मंडळी आपल्याला वेळोवेळी सांगत असतात. पुरणपोळी , गुळपोळी, सांजापोळी, खवापोळी तूप घालून स्वाद घेताना काय बोलावे. चकल्या, कुरवड्या, करंज्या, विविध चिवडे असे स्वाद जगात कुठेच दिसत नाहीत. या सणामागे त्यात्या ठराविक ऋतूत शरीराला आवशक असणारी गरज धरून त्यानिमित्ताने खाणे झालेने शरीर योग्य स्थितीत राहू शकते. यासाठी हे विविध सणसमारंभ.
आपल्या देशात आर्य ते आजपर्यंत अनेकांनी देशावर आपापली संस्कृती विविध मार्गांनी आणली.
या सण समारंभाचा वापर करून देशातील पारतंत्र्यात असलेल्या लोकांना उठाव करणेसाठी लोकमान्य टिळक, गांधीजी , वलाभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस , इत्यादि अनेक लोकांनी याचा वापर केला. पण स्वातंत्र्यानंतर मात्र उडानटप्पू, छचोर फक्त जाती जाती मध्ये वादविवाद वाढवणारे लोकांकडे सत्ता जास्त काळ ताब्यात गेली असलेमुळे या सणामुळे आनंद लोप पावत चालला आहे. किंबहुना पूर्वीचे नेते आज जिवंत असते तर त्याना रडु कोसळले असते. पैसे मिळवायसाठी गणेशोत्सव नवरात्र त्यासाठी मग गल्ली गल्लीबोळातील गुंडांनी लोकसेवा नावाखाली मंडळे काढून एक प्रकारचा धंदाच चालू केला. राजकारण करणाऱ्या मंडळीना सपोर्ट देवू म्हणत पोलिसांना गप्प करून हि मंडळे वेळकाळचे भान न ठेवता प्रचंड आवाजात डॉल्बीचा धिंगाणा घालत आहेत. आसपासचे परिसरातील जनता मुग गिळून घाबरून गप्प बसतात. बरे या नोंद असलेल्या गुन्हेगार मंडळीना पोलीस यंत्रणा परवानगी कसे देते हे काय सांगायला पाहिजे. सणाचा मूळ हेतूच संपून गेला आहे. पण हे कुठेतरी थांबायला पाहिजे. 
पुन्हा निश्चितपणे बरी मंडळी राजकारणात येताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे , सुप्रिया सुळे , जयंत पाटील , राज ठाकरे हि प्रमुख राज कारणी मंडळी ज्याना त्यात्या पक्षात महत्वाचे स्थान आहे. आता फक्त मी महाराष्ट्र एवढेच लक्षात घेवून लिहित आहे. या मंडळीनी आपापले राजकारण करावे . पण वाईट प्रथा चुकीचे विचार दूर करणेसाठी एकत्रित प्रयत्नशील का बरे राहू नये. वाइटाला वाइट हि माणसे म्हणण्याची हीमत करू शकतात. 
यावेळी गणेशोत्सव थोडा चांगलाच झाला असे म्हणू शकू. पण सरकारसह समाजातील दबदबा असणारी लोक एकत्र येवून वाइट प्रथा बंद केल्यास हे सणाचा आनद लोकांना पुन्हा घेता येयील हे नवरात्री निमित्त. नवरात्रीच्या
शुभेच्या!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा